Friday, 3 February 2012

क्रांती स्वातंत्र्याची



३ फेब्रुवारी १८३२
हुतात्मा क्रांतिवीर उमाजी नाईक बलिदान दिन.

दादाजी नाईक व लक्ष्मीबाई नाईक यांच्या पोटी उमाजी नाईक यांचा जन्म भिवडी, तालुका - पुरंदर, जिल्हा - पुणे येथे झाला. रामोशी जमातीत जन्मलेल्या उमाजी यांचा चोरी करने हा परंपरागत व्यवसाय होता. एका चोरीत ब्रिटीशानी त्यांना अटक केली त्यात त्यांना १ वर्षाची शिक्षा झाली. या काळात त्याना ब्रिटीशानी देशात चलाविलेली लूट, देशीय बांधवानवर होणारे अत्याचार यांविषयी उलगडा झाला व यापुढे ब्रिटिश सत्तेला विरोध हे आपले जीवन धेय त्यानी निश्चित केले. यासाठी त्यानी सशस्त्र क्रांति करण्याचा निर्णय घेतला.

तुरुंगातून बाहेर येताच त्यानी आपल्या जमातीतील लोकांना आपला विचार सांगून या लढ्यात सामिल करून घेतले. त्यांनी गनिमिकाव्याचा योग्य वापर करून ब्रिटीशानवर हल्ले सुरु केले. ब्रिटिशांचा खजिना लुटून , त्यांना ठार करण्याचा सपाटाच लावला.

लुटलेला पैसा लोकांमधे वाटुन, आड़ल्या-नडलेल्याना मदत करून त्यानी लोकांमधे विश्वास संपादन केला. त्याकारणाने ब्रिटीशानी त्यांचावर त्याकाळी ५०००/- चे ईनाम ठेवून ही कोणी उमाजीनच्या ठाव ठिकाणची माहिती देण्यास पुढे आला नाही.

पुढे त्यानी स्वत:ला राज्याभिषेक करून घेवुन नविन सरकार स्थापन झाल्याचे जाहिर करून स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्या द्वारे त्यांनी जनतेला ब्रिटीशान विरुद्ध उठाव करण्याचा आदेश दिला व जो यात सक्रिय सहभाग घेवुन ब्रिटीशानचा जास्तीत जास्त विध्वंस करेल त्याना नव्या सरकारद्वारे इनामे, जहागी-या, बक्षिसे देण्यात येईल असे जाहिर केले.

उमाजिंचा वाढता उपद्रव, ब्रिटीशान विरोधी वाढत्या करवाया याने हादरून जावून ब्रिटिशांनी त्यांना पकडण्याचा चंग बांधला व या वेळेस त्यांच्या प्रयत्नाना यश येवून फंद-फितुरिने उमाजीना
१५ डिसेम्बर १८३१ रोजी पकडण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात त्याना सासवड येथे आणन्यात आले. तेथे त्यांचावर राजद्रोह आणि इंग्रज शिपाई, अधिकारीना ठार मारण्याचा आरोप ठेवून खटला भरण्यात आला व या खटल्याचा निकल लगेच देवून त्याना फाशीची शिक्षा देण्यात आली.

३ फेब्रुवारी १८३४ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी पुण्यात उमाजीना फाशी देण्यात आ

© 2011 Lane 46 |  ©Blogger templates by Ourblogtemplates.com| Please come again

Back to TOP