Showing posts with label बातमी. Show all posts
Showing posts with label बातमी. Show all posts

Saturday, 24 December 2011

निवडणुकीत तरुणांचा सहभाग


निवडणुकीच्या प्रक्रियेत युवकांनी अग्रेसर रहावे, अशी अपेक्षा मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केली. लोक भयमुक्त होऊन बोलतील आणि सरकार त्यांच्या म्हणण्यानुसार कृती करेल तेव्हा खरी लोकशाही अस्तित्वात येईल, निवडणुका हा जबाबदार प्रतिनिधी निवडण्याचा मान्यताप्राप्त आणि क्रांतिकारक मार्ग आहे. त्यात लोकांच्या नागरी आणि राजकीय हक्काचे व्यासपीठ आहे, मतदानाचा हक्क सर्वोच्च आहे. भारतीय लोकशाहीला स्वतःची ओळख आणि इतिहास आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि घटनेच्या शिल्पकारांनी याचा पाया घातला आहे. संसद, न्यायसंस्था, राजकीय पक्ष आणि माध्यमे ही लोकशाहीव्यवस्थेचे अविभाज्य घटक आहेत. याहून श्रेष्ठ भारतीय जनताच आहे. लोकशाही रुजवण्यात निवडणूक आयोगाचे योगदान मोलाचे आहे.

-Anil Gaikwad

न्यायालयांची गरज


राज्यभरात आणखी आठ जिल्हा न्यायालयांसह 105 तालुका न्यायालयांची गरज असून तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी नवीन न्यायालये न्यायाधीशांच्या निवासस्थानांसाठी आवश्यक आहे. अनेक न्यायालयांमध्ये प्राथमिक सुविधाही नसून या सुविधा पुरविण्यात आणखी पंधरा वर्षे लागण्याची भीतीही उच्च न्यायालयाला दिलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.पायाभूत सुविधेसाठी किमान दोन हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, सध्याच्या वार्षिक 110 कोटी रुपयांच्या तुलनेत या सुविधा पूर्ण होण्यासाठी आणखी किमान पंधरा वर्षे लागतील, अशी शक्यता रजिस्ट्रार जनरलनी मुख्य न्यायमूर्तींना दिलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कुटुंब न्यायालये, महानगर दंडाधिकारी न्यायालये आणि ग्राम न्यायालयांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.


Anil Gaikwad

© 2011 Lane 46 |  ©Blogger templates by Ourblogtemplates.com| Please come again

Back to TOP